सात आजारी सरकारी कंपन्यांना टाळे
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सात आजारी कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
केंद्र सरकारच्या ताब्यातील २६ आजारी आस्थापनांबाबतचा आराखडा निती आयोगाने तयार केला आहे. यापैकी सातकरिता मंत्रिमंडळाची परवानगी घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
हिंदुस्थान केबल, टायर कॉर्पोरेशन, एचएमटी वॉचेस, बर्ड्स ज्युट अॅ ण्ड एक्स्पोर्ट लिमिटेड, सेंट्रल इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या त्या कंपन्या असल्याचे सांगण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात निती आयोगाने १२ आजारी कंपन्यांची नावे निश्चित केल्याचे सांगण्यात येते. यामध्ये नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, स्कूटर्स इंडिया आणि हिंदुस्थान फ्ल्युरोकार्बन्स यांचा समावेश आहे.